खरीप पिकांच्या संयुक्त पिक पाहणीची अधिसूचना तातडीने काढा: बी आर एस पक्ष नेते संजय पाटील

 खरीप पिकांच्या संयुक्त पिक पाहणीची अधिसूचना  तातडीने काढा: बी आर एस पक्ष नेते संजय पाटील 




कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क

 ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस न पडल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनात गत सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या पिक विमा नुकसान भरपाईची 25% पर्यंत आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. विमा कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना आगाऊ 25% पर्यंत नुकसान भरपाई देण्याबाबत निश्चित करण्याचे पत्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी काढले आहे .त्यामुळे आता संयुक्त पीक पाहणीची अधिसूचना जिल्हाधिकारी या नात्याने तुमची आहे. ती तातडीने काढावी अशी मागणी बीआरएस पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत अन्यथा आम्हाला आंदोलन कराव लागेल. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे त्यामुळे परिणामी उत्पादनात मोठी घट येणार आहे. किमान 21 दिवसांचा खंड पडला तर विमा कंपनीस नुकसान भरपाई देण्याची जोखीम आहे त्यामुळे पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश काढावे

अश्या प्रकारचे निवेदन यावेळी देण्यात आले.


यावेळी बी आर एस पक्ष नेते श्री संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समन्वयक तोहिद बक्षू, संग्राम जाधव, विक्रम जरग, भीमराव पाटील, साकेतराज देशमुख ,सतीश मोटे, प्रकाश पाटील ,संदीप वाडकर, तानाजी मोरे, रोहित जाधव, महेश परीट यांचा समावेश होता

Comments